प्रधान सचिवांचा कक्ष

श्रीमती. आय.ए. कुंदन(भा. प्र. से.)
श्रीमती. आय.ए. कुंदन(भा. प्र. से.)
प्रधान सचिव कामगार विभाग

भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्राचा कामगार विभाग कामगार कल्याणाला प्रोत्साहन देऊन आणि औद्योगिक विकासाला चालना देऊन योगदान देण्यास वचनबद्ध आहे. हे साध्य करण्यासाठी विविध उद्योगांसाठी एक सक्षम वातावरण निर्माण करणे, व्यवसाय सुलभ करण्यास मदत करणे त्यानुषंगाने उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. कामगार कल्याण ही सर्वोच्च प्राथमिकता असून कामगारांसाठी सुरक्षा, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतन सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  

कामगार विभाग व्यवसाय सुलभतेची गती टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन सुधारणा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा  वापर करत आहे. आपले सरकार आणि मैत्री सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म व्दारे सेवा वितरणाचा मार्ग सुलभ करत असून वेळेवर, पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित सेवा सुनिश्चित करत आहेत. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा सन्मान, कल्याण आणि फायद्यांचे समान वाटप सुनिश्चित करण्यासाठी विभाग कटीबद्ध आहे. 

महाराष्ट्र राज्याचा कामगार विभाग आर्थिक स्पर्धात्मकता आणि सामाजिक न्याय संतुलित करून देशातील सर्वात जास्त पसंतीचे गुंतवणूक ठिकाण असल्यामुळे काम करण्यासाठी, करिअर घडविण्यासाठी आणि देशाच्या विकासात  योगदान देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. भागधारकांसोबतच्या सहयोगी प्रयत्नांद्वारे, विभाग एक लवचिक आणि भविष्यासाठी तयार कामगार परिसंस्था तयार करत असून राज्याच्या आर्थिक आकांक्षांना समर्थन देते आणि कामगारांच्या न्याय हक्क आणि कल्याण यांचे रक्षण करते.